पिकविमा भरण्याची मुदत वाढवा –श्री धनंजय मुंडे

0
1008
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –

 

खरीप हंगामाचा पिकविमा भरण्याची दि.31 जुलै ही शेवटची तारीख आहे, मात्र, ऑनलाईन पिकविमा भरण्यात प्रचंड विलंब आणि अडचणी येत असल्याने पिकविमा भरण्याच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली.

राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका पिकविमा भरून घेण्यास टाळाटाळ करीत असुन शासनाने नियुक्त केलेल्या केंद्राद्वारे ऑनलाईन पिकविमा भरण्यास प्रचंड विलंब आणि तांत्रिक अडचणी येत असल्याने पिकविमा भरण्याच्या हक्कापासुन शेतकरी वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असल्याच्या बाबीकडे त्यांनी आज विधानपरिषदेत सरकारचे लक्ष वेधून घेत याप्रकरणी सभापती यांनी निर्देश देण्याची विनंती केली. सभागृहात उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घेत, एकही शेतकरी पिकविमा भरण्यापासुन वंचित राहणार नाही, ऑफलाईन पिकविमा स्वीकारण्याबाबत केंद्राला विनंती केली आहे. दि.31 जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा भरावा, त्यानंतरही त्यांना पिकविमा भरता आला नाही त्यांचाही पिकविमा भरून घेण्याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.