कोल्हापूर – आळते (ता. हातकणंगले) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता असल्याचे १६ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आले. त्यांच्या नातेवाइकांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी सांगलीतील एका तत्कालीन पोलीस अधिकार्यावर घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी नवी मुंबईतील पोलीस आयुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घातपाताच्या संशयाच्या घटनेची नोंद घेण्यात येत नसल्याने बेपत्ता महिलेच्या नातेवाइकांनी न्यायालयात धाव घेतली